Remote control.....आपल्या आयुष्याचं




काय राजेहो काहींचं बोलणं ऐकून वाटतं कि हे माणसं आहेत कि जनावरं, चुक स्वत: करून बसत्यात अन् दुसर्याला म्हणत्यात कि तुझ्यामुळे माझं मुड खराब झालं...!! हो मान्य आहे की आपण माणूस आहोत त्यामुळे चुका ह्या होतीलच आणि होऊ शकते कि आपल्यामुळे कुणाचं कधी मन दुखावलं जाईल तर कधी मुड खराब होईल...पण अरे तु एवढा इतरांसाठी उपलब्ध कशाला झाला रे कि ज्याचा शेवटी तुलाच त्रास होईल...?? आणि हो चुक झालीच तर आहे ना त्यावर उपाय माफी मागण्याचा, समोरचा माफ करत असेल तर ठीकच ठीक नाही केलं तर त्याहूनही अधिक ठिक...पण महत्त्वाचं हे आहे कि चुक लक्षात आल्यावर त्याची माफी मागणं....पण कुठेतरी सेल्फ रिस्पेक्ट चाही भाग येतोच म्हणा, आपण माफी मागतोच मागत आहे पण समोरची व्यक्ती ते समजून घेण्यासाठी नावच नाही घेत असावी तर लांबूनच सलाम ठोकायचा मग..पण सेल्फ रिस्पेक्ट नाही हो गमवायची. पण व्यक्ती महत्त्वाची कि सेल्फ रिस्पेक्ट हे आपलं आपणंच ठरवायचं असतं हो....!!

विषय हा होता कि कुण्या एका मुळे मुड खराब होण्याचा......!! तर त्या दिवशी काय झालंं...?? मी बोलताना सहज बोलून गेलो आणि माझ्या तिला खुप वाईट वाटलं, गोष्ट अगदी सोप्या भाषेत तिला समजावून सांगितली होती पण ती ऐकायलाच तयार नव्हती. मग ती काही वेळ बोललीच नाही.मला वाईट होतं कि, यार आपण तर हिला सहजच म्हटलं तर याचं तिला एवढं कसं काय वाईट वाटलं..?? मग मीच बोललो, का गं मला तु मित्र मानतेस ना तर मग माझ्या बोलण्याचं एवढं कशाला वाईट वाटून घेतलं हो...!! मग ती म्हणाली " प्रश्न हा नाही रे कि तु मला बोलला, प्रश्र्न तर हा आहे की तुझ्या मुळं माझा अख्खा दिवस वाया गेला, तु माझा पुर्ण मूडच ऑफ करून टाकला..." मी तर शॉकच झालो...!!  आणि मग तिला प्रेमानं जवळ घेत समजावून सांगितलं...सखे हे बघ.......

कुणी आपल्याला काही ही बोललं ना तर त्याचा एवढा फरक नाही हं पडू द्यायचा आणि उगाच स्वत:ला त्रास नाही करून घ्यायचा...आणि हो जर ते बोलणं आपल्या अस्तित्वाला सुधरवण्यासाठी बोललं गेलं असेल तर ते एकून घेऊन स्वत:मध्ये जरुर बदल घडवायला नाही हं विसरायचं. सगळ्यात महत्त्वाचं स्वत:चं #remote control हेे नेहमीच स्वत:जवळच असायला हवं. ते कधीच इतर कुणाकडेे जायला नको.

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........